cereal grains, sack, harvest-6106821.jpg

“Golden wheat in black list?”

 “आरोपीच्या पिंजरा आणि गहू
गेले काही दिवस सकाळी सकाळी whats app पाहिले कि वाचकांचे खूप एकसारख्याच आशयांचे messages मला येताय .
एक गव्हाबद्दलची भली मोठी पोस्ट आणि लगेच ख़ाली प्रश्न ,”म्हणजे आम्ही पोळ्या खाणे सोडावे की काय?” “गहू  खाणे बंद करू का आम्ही ?” “डॉ क्रुपया या पोस्ट बद्दल काहीतरी लिहा” असे अनेक प्रश्न आणि यासम्बन्धी आयुर्वेद संदर्भ आणि माझे मत सतत वाचक मागताय म्हणून ही पोस्ट ! (माझी पोळ्यावाली काकू voluntary retirement घेऊ नये हा देखील स्वार्थ )
या पोस्ट मध्ये मी खूप सखोल गव्हाचा इतिहास त्यावरचे किचकट संशोधन आणि त्याचे संदर्भ देणे टाळतेय कारण आम्ही पोळ्या खाऊ की नाही असा साधा प्रश्न वाचक वर्गाला पडलाय.
गेल्या काही वर्षात gluten allergy आणि gluten free food चा फारच गवगवा होतोय.अर्थात् तो पाश्चिमात्य देशातून भारतात पोचला.
allergy ही गव्हातील gluten खेरीज खूप पदार्थांची असू शकते काही उदाहरणे द्यायची झाल्यास अंडी ,शेंगदाणे ,दूध आणि दुधाची व्यंजने इत्यादि. म्हणुन सगळ्यांनी  खाण्यातुन  या गोष्टी सरसकट बाद केल्या का ?
या पदार्थांचे मार्केट खुप मोठे आहे.अगदी असाच सीन तुप आणि तेलाच्या संशोधनाने काही वर्षापूर्वी लोकांसमोर मांडला होता .अनेक वर्षे तेलातूपाला आपण वाळीत टाकले होते.आज संशोधक पूर्वीचे संशोधन खोडून काढ्ताय आणि तेल तुपाची औषधी बाजू जगासमोर आणली जातेय.
गव्हाच्या बाबतीत कमीत कमी शब्दात आणि सरळ भाषेत काही मुद्दे .
गहू गुणांनी थंड ,शरीराचे उत्तम पोषण करणारे ,पचायला जड आणि हाडांना जोडणारे अथवा सांधणारे असे वर्णन आयुर्वेदिक ग्रंथात आहे
1.गहू गुरु गुणांचे म्हणजेच पचायला जड़ असतात.गुरु गुणांच्या अन्न द्रव्याना आयुर्वेदात एक नियम असतो.असे पदार्थ हे खूप प्रमाणात खूप वेळा आणि पचन्शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी जपून खावे .खाताना ऋतू ,देश आपली प्रक्रुती याचे ही तारतम्य ठेवावे .
आम्ही वैद्य लोक सारखे ज्वारी बाजरी भाकरी  वर भर देतो याचे हेही एक कारण होय.
2.allergy हे सुक्ष्म स्तरावरील अपचनाचेच स्वरूप होय.तुम्ही नीट पचवू न  शकलेले घटक आमस्वरुपात वेगवेगळे रोग निर्माण करणारच, मग ते गव्हाचे अजीर्ण असो अथवा एखादया फळाचे नाहीतर माँसाहाराचे नाहीतर एखाद्या औषधाचे.
पचनानंतर बनलेला घटक शरीराला सात्म्य नसेल तर तो  शरीरात शोषल्या जात नाही ,उलट शरिराकडुन त्याला प्रतिरोध म्हणुन allergy ची लक्षणे दिसतात.
3.गहू गुणांनी चिकट असतो म्हणुनच कणीक तिम्बताना त्यात स्नेह म्हणजेच तेल घातले जाते जेणेकरून त्याचा चिकट्पना पचनाच्या आड येऊ नये.
एक गोष्ट ध्यानात असू द्या गव्हाचा आम्बवून तयार केलेला ब्रेड आणि गव्हाची ताजी नीट भाजलेली गरम साजुक तुप घातलेली पोळी यात गुणांनी निश्चित फरक असणार.
4.गव्हाने कोलेस्टरॉल वाढते असे जे म्हट्लेय हा मुद्दा परत गव्हाचे अपचन असाच आहे.सरसकट सगळ्याना ते होण्याचे कारणच नाही.याही ऊपर आता पाश्चिमात्य संशोधकांचे च म्हणणे आहे की कोलेस्टरॉल आणि ह्रूद्रोग सम्बन्ध अनिश्चित आहे म्हणुन.त्यामूळे गहू खाल्याने ह्रूद्रोग होतो म्हणणे खूप जास्त धाडसाचे आहे .
5.आज अन्नधान्य त्या त्या प्रदेशापुरते मर्यादित न  राहता सर्वत्र उपलब्ध असते आणि खाल्ले जाते.हट्टाकट्टा पंजाब चे मुख्य धान्य गहू ही त्याला अपवाद नाही.
शेतीकरनात झालेली आमूलाग्र क्रांती उत्पादन वाढविण्यास उपकारक ठरली मात्र मूळ धान्याचे गुणधर्म त्यात कायम राहिले की नाही या शंकेला वाव आहे.
आपण काय करावे ?अन्नधान्य संकरित आहे फळे क्रूत्रिम रित्या पिकवलि जातायत,मांस सम्प्रेरक युक्त असते.
गव्हाचे सांगायचे झाले तर सम्पूर्ण गहू बंद करणे हा उपाय नव्हे.
आपल्या मूळच्या चालीरीती आणि खाद्यसंस्कृती यात खरे उत्तर होय.
एकच एक गहू असे न  करता ज्वारी ,बाजरी ,नाचणीपासून  केलेल्या भाकरी खाण्यात असाव्या.
मागे मी नाश्त्याची पोस्ट जेंव्हा लिहलि तेंव्हा वैविध्य आणि समतोल असे दोन मुद्दे ग्रुहीत धरूनच वेगवेगळे 30 पदार्थ सांगितले होते.
भात वर्ज्य करा सांगणारे परत भात खा आणि पोळ्या सोडा  म्हणताय.विविध स्थानिक फळे भाज्या धान्य व्यंजने याचा आहारात समतोल असावा.स्वतची पचन शक्ति ध्यानात घ्यावी.कुठल्याच एक पदार्थाचा अतिरेक करू नये.
गव्हा बाबतची ती पोस्ट म्हणजे कुठल्यातरी ओट सारख्या पदार्थांची बाजारात आणण्यापुर्विची marketing strategy देखील असू शकते.एकदा गव्हाला वाईट ठरवले की येणाऱ्या पदार्थांची विक्री पक्की.
तेंव्हा panic होऊ नका.समतोल आहाराविषयक सल्ला जरूर घ्या.
Share this :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart